दीनदयाळ व्याख्यानमाला पहिले पुष्प
नगर रिपोर्टर
अहमदनगर - भारताचा जन्म कधी झाला हे कोणीही सांगू शकत नाही, भारत अमर आहे. ज्याचा जन्म होतो, त्याचा मृत्यू अटळ असतो. पाकिस्तानला जन्मतारीख आहे, म्हणून मृत्यूही अटळ आहे. 35 अ व 370 कलम हटल्यामुळे जम्मू-काश्मिरमधील वेगळे अधिकारी संपूष्टात आले आहेत. आता भविष्यात लाहोरसह अखंड भारत झाला पाहिजे. यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेशकुमार यांनी करुन व्याख्यानमालेस उपस्थित असलेल्या हजारो नागरिकांकडून दोन्ही हात वर करुन ‘मृत्यू झाला तर अखंड भारतातच झाला पाहिजे, लाहोरसह अखंड भारत झाला पाहिजे’, असा संकल्प करुन घेतला.
अहमदनगर - भारताचा जन्म कधी झाला हे कोणीही सांगू शकत नाही, भारत अमर आहे. ज्याचा जन्म होतो, त्याचा मृत्यू अटळ असतो. पाकिस्तानला जन्मतारीख आहे, म्हणून मृत्यूही अटळ आहे. 35 अ व 370 कलम हटल्यामुळे जम्मू-काश्मिरमधील वेगळे अधिकारी संपूष्टात आले आहेत. आता भविष्यात लाहोरसह अखंड भारत झाला पाहिजे. यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेशकुमार यांनी करुन व्याख्यानमालेस उपस्थित असलेल्या हजारो नागरिकांकडून दोन्ही हात वर करुन ‘मृत्यू झाला तर अखंड भारतातच झाला पाहिजे, लाहोरसह अखंड भारत झाला पाहिजे’, असा संकल्प करुन घेतला.
पंडित
दीनदयाळ पतसंस्थेच्यावतीने दीनदयाळ व्याख्यानमाला समिती आयोजित चौथ्या व्याख्यानमालेचे
उद्घाटन इंद्रेशकुमार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने
झाले. यावेळी विशेष पोलिस महानिरिक्षक कृष्णप्रकाश, खासदार सुजय विखे, उपमहापौर मालन
ढोणे, संघाचे प्रांतप्रमुख नानासाहेब जाधव आदि प्रमुख पाहुणे उपस्थित होते. यावेळी
इंद्रेशकुमार यांनी ‘काश्मिर काल, आज आणि उद्या’ या विषयावर पहिले पुष्प गुंफले. पतसंस्थेचे
अध्यक्ष वसंत लोढा, उपाध्यक्ष गौतम दीक्षित, मानद सचिव विकास पाथरकर, व्याख्यानमाला
समितीप्रमुख धनंजय तागडे, कार्याध्यक्ष सुहास मुळे व संचालकांसह मोठ्या संख्येने विविध
क्षेत्रातील नागरिक माऊली सभागृहात उपस्थित होते.
यावेळी
बोलतांना इंद्रेशकुमार पुढे म्हणाले, भावनांचा उद्रेक झाल्यावर क्रांती जन्म घेते,
त्यातुनच 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. काँग्रेसने भारतास स्वातंत्र्य मिळवून
दिले, असे आपल्यावर बिंबले गेले, मात्र हे सर्वात मोठे खोटे आहे. काँग्रेसने भारतास
स्वातंत्र्य नाही तर विभाजन दिले आहे. हे भारताचे सर्वात मोठे दुर्भाग्य. चीन व पाकिस्तानने
1962 साली भारताची भुमी घटवली. असे किती अपमान भारताने सहन करायचे. काँग्रेसचे संसदेमध्ये
दोन तृतांश बहुमत होते. या बहुमताच्या जोरावर खेळ करत राष्ट्रपतींच्या सहीने 35 अ व
370 कलम आणून देशाचे पुन्हाएकदा विभाजन केले. एका देशात दोन निशान, दोन नागरिकत्व,
दोन पंतप्रधान निर्माण केले. हा लोकशाहीचा सर्वात मोठा अपमान केला. 370 व 35 अ मुळे
देशाचे किती नुकसान झाले, हे सर्वजण जाणतात. संघ परिवाराने या निर्णयाला तीव्र विरोध
केला. डॉ.श्यामप्रसाद मुखर्जी यांनी लढा दिला तर त्यांना विषप्रयोग करुन मारले.आता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धाडसी निर्णय घेत हे 35 अ व 370 कलम हटवले आहे. त्यामुळे
काश्मिरी पंडित, शिया मुस्लिम, शिख हे काश्मिरमधील नागरिक खुष झाले आहेत, मात्र ज्यांची
दुकानदारी चालू होती, त्यांच्या स्वप्नांचा चुरडा झाला आहे. या महत्वपूर्ण निर्णयामुळे
भारताचा अविभाज्य भाग असलेला जम्मू काश्मिर विकासाच्या पथावर येऊन सुजलाम, सुफलाम होऊन
तेथे शांतता नांदेल. लाहोर शिवाय भारत अपुर्ण आहे, असा नारा आता आपण दिला पाहिजे.
पोलिस
महानिरिक्षक कृष्णप्रकाश म्हणाले, बौद्धीक व मानसिकदृष्ट्या जनजागृती करणारी दीनदयाळ
व्याख्यानमाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून वसंत लोढा मला या व्याख्यानमालाला पाचारण
करत होते. मात्र यावर्षी योग आला. एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आल्याचे
समाधान मला होत आहे. व्याख्यानमालेच्या माध्यमातून समाजातील ज्वलंत प्रश्न मांडले
जात आहेत, त्यामुळे व्याख्यानमालेच्या माध्यमातून संस्कृती जपण्याच्या काम होत आहे,
अशा शुभेच्छा देऊन जातीय सलोख्याबद्दल त्यांनी विषय मांडले.
खा.सुजय
विखे म्हणाले, इंद्रेशकुमार यांनी फार प्रभावीपणे काश्मिर व 370 बद्दल विषय मांडला
आहे. जेव्हा हे 370 कलम हटविण्यासाठी संसदेत विधायक मांडले गेले. तेव्हा मी सदस्य म्हणून
हजर असल्याचा अभिमान आहे. सुरुवातीपासून काँग्रेसमध्ये
राहिल्यानंतर आता योग्य पक्षात आलो आहे. याचा मला आनंद वाटतो.
व्याख्यानमालेच्या
प्रास्तविकात वसंत लोढा म्हणाले, पंडित दीनदयाळ पतसंस्था 1991 साली छोट्याशा जागेत
सुरु झालेली ही संस्था आज 50 कोटी ठेवी असलेला विशाल वटवृक्ष झाला आहे. अर्थपुरवठा
करण्याबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, संस्कृतीक क्षेत्रात काम करत, शहर विकासास चालना देत
आहे. आता या संस्थेमार्फत ‘दीनदयाळ परिवार’ या नव्या संकल्पनेस या व्याख्यानमालेच्या
उद्घाटनानिमित्त सुरुवात करत आहोत. दीनदयाळ परिवारात सर्व स्तरातील, जाती-धर्माचे व
विविध क्षेत्रातील नागरिकांचा सहभाग असणार आहे. दीनदयाळ परिवारामार्फत देशात, राज्यात,
जिल्ह्यात कोणतीही आपत्ती आल्यावर मदत कार्य करण्याबरोबरच परिवाराचे सदस्य असलेल्या
प्रत्येकावरील संकट व अडचण दूर होण्यासाठी
तत्पर असणार आहे. सर्व नागरिकांनी या दीनदयाळ परिवारात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी
केले.
व्याख्यानमालेच्या
उद्घाटन कार्यक्रमास दीनदयाळ पतसंस्थेचे संचालक नकुल चंदे, डॉ.ललिता देशपांडे, आर.डी.मंत्री,
नरेंद्र श्रोत्री, निलेश लोढा, अनिल सबलोक, व्याख्यानमाला समितीचे मधुसूदन मुळे, दामोदर
बठेजा, प्रा.सुनिल पंडित, बाळासाहेब भुजबळ, गौतम कराळे आदि उपस्थित होते. पतसंस्थेचे व्यवस्थापक निलेश
लाटे, सुखदेव दरेकर व कर्मचार्यांनी सहकार्य केले. शारदा होशिंग यांनी सूत्रसंचालन
केले. गौतम दीक्षित यांनी आभार मानले. संपूर्ण वंदे मातरम्ने कार्यक्रमाची सांगता झाली.
0 Comments