अहमदनगर - जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती व पर्जन्यमानातील अनियमितता व कमी पाऊस व पावसातील कालावधीमध्ये मोठा खंड पडतो. त्यामुळे कृषी उत्पादनात मोठया प्रमाणात घट होऊन शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे शेतकर्यांनी ‘पंतप्रधान पिक विमा’ योजनांतर्गत जास्तीत जास्त सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.
खरीप हंगाम 2016 पासून राज्यात पंतप्रधान पीक विमा योजना खालील अटीनुसार अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. योजनेची प्रमुख वैशिष्टये - कर्जदार शेतकर्यांना योजना बंधनकारक आहे. बिगर कर्जदार शेतकर्यांना ऐच्छिक आहे. खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडे पट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजने अंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार असून शेतक-यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतक-यांनी भरावयाचा विमा हप्ता दर हा खरीप हंगाम 2 टक्के व नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. सर्व पिकांसाठी 70 टक्के जोखिमस्तर निश्चित करण्यात आला आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकाचे उंबरठा उत्पन्न हे मागील 7 वर्षा पैकी सर्वाधिक उत्पन्नाच्या 5 वर्षाचे सरासरी उत्पन्न गुणीले त्या पिकाचा जोखिमस्तर विचारा घेऊन निश्चित केले जाईल.
जिल्हयातील योजनेत समाविष्ट पीके विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता रक्कम - जिल्हयातील अधिसूचित पिके- भात- 8 मंडळात, विमा संरक्षण रक्कम प्रति हेक्टर 40 हजार, शेतक-यांनी भरावयाचा पीक विका हप्ता प्रति हेक्टर 800 रुपये, बाजरी- 97 मंडळात, विमा संरक्षण रक्कम प्रति हेक्टर 20 हजार, शेतक-यांनी भरावयाचा पीक विका हप्ता प्रति हेक्टर 400 रुपये, भुईमूग- 86 मंडळात, विमा संरक्षण रक्कम प्रति हेक्टर 25 हजार, शेतक-यांनी भरावयाचा पीक विका हप्ता प्रति हेक्टर 500 रुपये, सोयाबीन- 53 मंडळात, विमा संरक्षण रक्कम प्रति हेक्टर 32 हजार 500, शेतक-यांनी भरावयाचा पीक विका हप्ता प्रति हेक्टर 650रुपये, तिळ- 8 मंडळात, विमा संरक्षण रक्कम प्रति हेक्टर 12 हजार 500, शेतक-यांनी भरावयाचा पीक विका हप्ता प्रति हेक्टर 250रुपये, सूर्यफूल- 8 मंडळात, विमा संरक्षण रक्कम प्रति हेक्टर 23 हजार 100, शेतक-यांनी भरावयाचा पीक विका हप्ता प्रति हेक्टर 462 रुपये , मूग- 59 मंडळात, विमा संरक्षण रक्कम प्रति हेक्टर 17 हजार 500 हजार, शेतक-यांनी भरावयाचा पीक विका हप्ता प्रति हेक्टर 350 रुपये, तूर- 79 मंडळात विमा संरक्षण रक्कम प्रति हेक्टर 31 हजार 500, शेतक-यांनी भरावयाचा पीक विका हप्ता प्रति हेक्टर 630रुपये, उडीद- 15 मंडळात विमा संरक्षण रक्कम प्रति हेक्टर 17 हजार 500, शेतक-यांनी भरावयाचा पीक विका हप्ता प्रति हेक्टर 350 रुपये, कापूस- 62 मंडळात विमा संरक्षण रक्कम प्रति हेक्टर 38 हजार 750 रुपये, शेतक-यांनी भरावयाचा पीक विका हप्ता प्रति हेक्टर 1 हजार 938 रुपये, मका- 05 मंडळात, विमा संरक्षण रक्कम प्रति हेक्टर 27 हजार 500, शेतक-यांनी भरावयाचा पीक विका हप्ता प्रति हेक्टर 550 रुपये व कांदा- 11 तालुक्यात विमा संरक्षण रक्कम प्रति हेक्टर 60 हजार शेतक-यांनी भरावयाचा पीक विका हप्ता रक्कम प्रति हेक्टर 3 हजार रुपये भरावे लागणार आहेत.
विमा कंपनीचे नाव- एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड, क्षेत्रीय कार्यालय- स्टॉक एक्सेंज टॉवर्स 20 वी मंजिल, पूर्व खंड दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई 23 ( दुरध्वनी क्र. 022- 61710901, 902, 903 टेलीफोन फॅक्स 61710915 ,टोल फ्री क्र. 1800 116515 व ईमेल ीेर्.ाीालरळसारळश्र.लेा असा आहे.
खरीप 2019 पासून सहभाग घेण्यासाठी विमा प्रस्ताव बँकेस सादर करताना सर्व बिगर कर्जदार शेतक-यांनी आपले फोटो असलेल्या बॅकखाते पुस्तकाची प्रत तसेच आधारकार्डाची छायाकिंत प्रत सादर करणे आवश्यक आहे. आधारकार्ड उपलब्ध नसल्यास आधारकार्ड नोंदणी पावती सोबत मतदान ओळखळपत्र , किसान क्रेडीट कार्ड, नरेगा जॉब कार्ड किंवा वाहन चालक परवाना या पैकी कोणतेही एक फोटो ओळख पत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार शेतक-यांनी आपले बँकेचे कर्जखात्याशी आधार कार्ड क्रमांक जोडण्यासाठी त्वरीत बॅकेशी संपर्क साधावा .
अर्ज भरण्यासाठी बँकामध्ये होणारी गर्दी टाळता यावी व शेतक-यांना अर्ज भरण्यास सुलभता यावी म्हणून गाव पातळीवर अधिकची सुविधा उपलब्ध होण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र ( डिजीटल सेवा केंद्र ) सुविधा शेतक-यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज भरण्याकरिता कृषी विभागाने नियोजन केले आहे. शेतक-यांनी पिक विमा संरक्षण मिळण्यासाठी दिनांक 24 जुलै 2019 पर्यत जास्तीत जास्त शेतक-यांनी या प्रधान मंत्री पिकविमा योजनेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,उप विभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच आपल्या गावातील कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांचे बरोबरच नजिकच्या बँकेशी संपर्क साधावा असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विलास नलगे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
0 Comments